पावसाने पाठ फिरविल्यामुळे राज्यात निर्माण होऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने शेतमालाला योग्य हमीभाव द्यावा , अशी मागणी रविवारी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. केंद्राकडून राज्यातील शेतमालाला रास्त हमीभाव न देण्यात आल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात महायुतीच्या संबंधांमधील तणाव आणखीनच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.