मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
आज (सोमवार) सकाळपासून कोल्हापूर, सांगली आणि साता-यात पेटलेल्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले असून सांगली वसगडे येथे जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका शेतक-याचा मृत्यू झाला आहे. चंद्रकांत नलावडे असे त्याचे नाव असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
ऊस दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाले असून या आंदोलनात १२ हून अधिक गाड्यांची तोडफोड झाली आहे. तसेच कोल्हापूरात आंदोलकांतर्फे पोलिसांची व्हॅनची जाळण्यात आली.
याआधी आंदोलकांनी सांगलीतील नांद्रे येथील वारणा, तासगाव आणि वसंतदादा साखर कारखान्यांचे विभागीय कार्यालय पेटवून दिलं आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठेवलेली साखर रस्त्यावर फेकली. तसंच इस्लामपूर परिसरातील पुणे - बंगळूरू महामार्गही रोखून धरला. त्यामुळे सांगली-कोल्हापूर, सांगली इस्लामपूर आदी रस्ते बंद करण्यात आले आहेत.
उसाला पहिली उचल २ हजार ३०० रूपयांची देण्याचा निर्णय जाहिर झाल्यानंतर संतप्त शेतकरू संघटनांनी आज (सोमवार) राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचा उशारा दिला होता. उसाला पहिली उचल तीन हजार लरूपये मिळावी व गतहंगामातील उसाला ५०० रूपयांचा हफ्ता मिळावा, या मागणीसाठी शेतकरी संघटनांनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे.




















परत एकदा सरकार ने सिद्ध केले कि ती फ़क़्त दुबळ्या लोकांवर शक्ती चा प्रयोग करते..रझा अकॅदेम्य ने जो धिंगाणा घातला त्या वेळी ही शक्ती कुठे गेली होती..संदर्भ वेगळा असेल कदाचित पण ही गोष्ट खरी असल्याचा pratya आला आहे
महाराष्ट्रात 173 सहकारी साखर कारखाने (को ऒपरेटिव्ह) तर 23 खासगी (प्राईव्हेट) साखर कारखाने आहेत.काही सहकारी का्रखाने प्रशासकिय अधिकारी /लिक्वीडेटर चालवतात तर काही खासगी कारखाने राजकीय नेते मंडळी चालवतात. या सर्व साखर कारखान्यांना स्थानिक शेतकरी उस पुरवतात. दोन तीन वर्षापुर्वी मा. शरद पवारांनी भारतात 50 रुपये प्रति किलो मिळण्याचे भाकित केले आणि भारतीय जनतेची लूटमार करण्यासाठी तात्काळ साखरेचे भाव 20-22 रुपये पासून 32-40 रुपये प्रतिकिलो झाले.परंतु त्या प्रमाणात उसाचे दर वाढले नाहीत.शरद पवारांच्या एका भाकितामुळे साखर कारखानदार गब्बर झाले तर बिचारे उस पिकविणारे शेतकरी वाढलेल्या महागाईत गरिबच राहिले.आता पवार साहेबांनी तोल गेल्यामुळे साखर कारखानदरीत जातीय वातावरण निर्माण केले व उसदरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळन लागले. याचे मुख्य कारण महाराष्ट्रात सरकार नावाची चीज नाही.