मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
कोल्हापूर शहरात प्रवेश करताना टोल आकारण्यासाठी उभारण्यात आलेले तीन टोलनाके रविवारी रात्री शिवसैनिकांनी जाळले. कसबाबावडा, शाहूनाका आणि फुलेवाडी या तीन ठिकाणांचे टोलनाके शिवसैनिकांनी रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास जाळले. या प्रकरणी राजारामपुरी आणि शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आयआरबी कंपनीकडे कोल्हापूरातील अंतर्गत रस्ते बांधणीचे २२० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीने बांधलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे आहेत, असे कोल्हापूरातील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यासाठी नागरिकांनी टोलविरोधी कृतीसमितीही स्थापन केली आहे. शिवसेनेचा या टोलवसुलीला विरोध आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी हे टोलनाके जाळल्याची माहिती आहे. रात्री सव्वा वाजते शिवसैनिक या तीनही टोलनाक्यांवर गेले आणि त्यांनी ते जाळले.
(संग्रहित छायाचित्र)
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा

















