पुणे-बंगळुरु महामार्गावरील तासवडे टोलनाक्याजवळ कॉलेजच्या सहलीची बस आणि उसाच्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले असून २२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा इंजिनिअरींग महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांची ही बस होती. सहलीवरुन गोव्याहून परतत असताना हा भीषण अपघात झाला. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सरु असून तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.