ज्येष्ठ सर्वोदयी आणि गांधीवादी नेते ठाकूरदासजी बंग यांचे आज (रविवार) वृद्धापकाळाने निधन झाले.  खादी आणि सर्वोदयी चळवळीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. सेवाग्राम आश्रमाच्या जडणघडणीतही त्यांचा सहभाग होता. त्यांना नुकताच महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चारच्या सुमारास वर्धा येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.