मध्य रेल्वेवरील आटगाव आणि आसनगाव या स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिकहून येणाऱ्या अनेक लांब पल्ल्याचा गाड्याही थांबविण्यात आल्या आहेत.
सकाळी नऊच्या दरम्यान वाहतूक थांबवून रुळ दुरुस्तीच्या कामास सुरुवात करण्यात आली. मात्र, तोवर कसारा ते आसनगाव दरम्यान अप मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.