मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात कोलाडजवळ तलवळी गावात रात्री दोनच्या सुमारास एसटी बसने रिक्षाला दिलेल्या धडकेत चार जण जागीच ठार झाले. मृत्यू झालेले चारही जण माणगाव तालुक्यातील दहीवली गावातील असून, आशिष पिसाळ, वैभव शिंदे, सुरेश तळवटकर, संदेश दाबाणे अशी त्यांची नावे आहेत.
याच सुमारास लोणेरे जवळच्या टेमपाले गावाजवळ भरधाव वेगातली मोटारसायकल एसटी बसवर समोरून आदळली. यात शंकर ढेरे व मारूती कचरे या दोघांचा मृत्यू झाला.