मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
रायगड जिल्ह्य़ात तब्बल पाच वर्षांनी थंडीची लाटची लाट आली आहे. उत्तरेकडील हिमवृष्टीचा आणि थंडीचा परिणाम आता कोकणातील बहुतांश भागात पाहायला मिळतो आहे. किनारपट्टीवरील भागातही तपमानाचा पारा घसरला आहे. जिल्ह्य़ात या हंगामातील सर्वात कमी तपमानाची नोंद रविवारी करण्यात आली आहे. या दिवशी १४.४ तपमानाची नोंद झाली आहे. तर माथेरानमध्ये पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरला आहे.
तब्बल पाच वर्षांनी जिल्ह्य़ात थंडीचा जोर आहे. २००८ मध्ये जिल्ह्य़ात १३.४ अशं सेल्सिअस तपमानाची नोंद झाली होती. त्यानंतर फारशी थंडी जाणवली नव्हती. २००९ मध्ये १६.४ अंश सेल्सिअस, २०१० मध्ये १७.४ अंश सेल्सिअस, २०११ मध्ये १४.८ अंश सेल्सिअस अशा तपमानाची नोंद झाली होती. तर २०१२ मध्ये पारा १४.४ पर्यंत घसरला होता. मात्र पाच वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्य़ातील कमाल व किमान तपमानाचा पारा घसरला असल्याचे दिसून आले आहे. माथेरानमध्ये तर १२ अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली आहे. अजून १० दिवस तरी जिल्ह्य़ात थंडीचा प्रभाव जाणवेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. जिल्ह्य़ात कर्जत, खोपोली, सुधागड पाली, रोहा, माणगाव, महाड,पोलादपूर परिसरात थंडीचा जास्त जोर पाहायला मिळतो आहे. त्यामुळे लोकरी कपडय़ांची मागणी वाढली आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















