प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करणा-या एस.एस.राजमौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. तीन आठवड्यात बाहुबलीने हा विक्रम केला आहे.
प्रभास आणि राणा डग्गूबती यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ४००० स्क्रिन्सवर तेलगू, तमिल, हिंदी आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आलेला आहे. याआधी पीके, धूम ३ या चित्रपटाने यापूर्वी ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता. दुसरीकडे सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’चा गल्ला सतत वाढतोच आहे. आता त्याने ३०० कोटी रुपयांच्या क्लबमध्ये प्रवेशही केला. ‘बजरंगी’ने आतापर्यंत २९२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आतापर्यंतच्या नोंदींनुसार ‘पीके’नंतरचा ‘बजरंगी’ हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ‘पीके’च्या गल्ल्याला ‘बजरंगी’ मागे टाकेल असे बोलले जात आहे.