‘दो दिल बंधे एक डोरी से’ या मालिकेसोबत खूप आठवणी जोडलेल्या आहेत. आता हा कार्यक्रम झी अनमोलवर दाखविण्यात येत असल्यामुळे मी खूपच उत्साहात आहे. दर्शक  पुन्हा आम्हाला प्रेम आणि प्रतिसाद देतील, अशी आशा या मालिकेतील कलावंत अरहान बहल यांनी व्यक्त केली.
झी अनमोलवर ‘दो दिल बंधे एक डोरी से’ची गेल्या १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. यातील कथा एका महिलेची आहे. तिचा विवाह तिच्या तुलनेत सर्वच बाबतीत कमी असलेल्या पुरुषासोबत झाला आहे. जोधपूरमध्ये घडत असलेल्या या कथेत शिवानी आणि रघु हे मालकीण आणि नोकर आहेत. समाजातील दोन वेगवेगळ्या स्तरातील दोघे आहेत. शिवानीला रघुसोबत लग्न करावे लागते, अशी परिस्थिती निर्माण होते. आजोबांचा नोकर असलेल्या रघुला पती म्हणून स्वीकार करताना शिवानीला तडजोड करावी लागते. रघु आणि शिवानी हा प्रवास ‘दो दिल बंधे एक डोरी से’मध्ये दर्शकांना पाहायला मिळत अहे. या कथेतील विविध पैलू बहल यांनी पत्रकारांशी बोलताना उलगडून दाखवले.
झी वाहिनीने मनोरंजनाची परंपरा निर्माण केली असून दर्शकांना काय हवे हे जाणून झी अनमोलच्या माध्यमातून लोकप्रिय शो पुन्हा दर्शकांना दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दो दिल बंधे एक डोरी से’ या मालिकेचे प्रसारण करताना आनंद होत आहे, असे झी अनमोलच्या व्यवसाय प्रमुख प्रियांका दत्ता यांनी नमूद केले.