आचार्य अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाने सवरेत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ मिळवून नवा इतिहास निर्माण केला होता. मध्यंतरीचा काही काळ सोडला तर राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीला फारसे स्थान नव्हते. पण, २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘श्वास’ या मराठी चित्रपटाने मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराचे दरवाजे पुन्हा उघडून दिले आणि मराठी चित्रपटांना नवा ‘श्वास’ मिळाला. गेले काही वर्ष जोगवा, बाबू बँड बाजा, धग आणि फँड्री, येलोसारख्या चित्रपटांनी सातत्याने राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारत मराठीचा झेंडा फडकवत ठेवला आहे.
‘श्वास’ प्रदर्शित होईपर्यंत मराठी चित्रपट विनोदी, ग्रामीण आणि तमाशापट अशा चाकोरीत अडकलेले होते. चाकोरीत अडकलेल्या मराठी चित्रपटांना ‘श्वास’च्या निमित्ताने वेगळा विषय मिळाला. प्रेक्षकानीही ‘श्वास’चे भरभरून स्वागत केले. त्यानंतर आलेल्या मराठी चित्रपटांनी विषयातील वैविध्यता आणि अन्य बाबींमध्ये बाजी मारत राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये पुन्हा एकदा आपले वेगळेपणे सिद्ध करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये अनेक मराठी चित्रपटांनी अभिनय, संगीत, दिग्दर्शन, पाश्र्वगायन अशा विविध गटांमध्ये पुरस्कार मिळवून या पुरस्कारांवर आपली मराठी मोहर उमटविली आहे.

‘यलो’चीसुद्धा कोटीच्या कोटी उड्डाणे!
बहुचर्चित ‘यलो’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाने आठवडाभरातच १ कोटी २० लाख रुपयांचा महसूल मिळविला आहे. राज्यातील काही प्रमुख महानगरात आणि अन्य शहरातही प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात चित्रपटाचे खेळ सुरू आहेत.

मराठीची घोडदौड..
* २००४ : श्वास’ला सर्वोत्तम चित्रपटासाठीचे सुवर्णकमळ आणि सवरेत्कृष्ट बाल कलाकार असे पुरस्कार.
* २००९ : देवदासीच्या प्रथेवरील ‘जोगवा’ या चित्रपटालाही सवरेत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्कारासह सवरेत्कृष्ट अभिनेता, सवरेत्कृष्ट संगीत, सवरेत्कृष्ट गायक, सवरेत्कृष्ट गायिका हे पुरस्कार
* २०१0 :‘मी सिंधुताई सकपाळ’ या चित्रपटानेही परिक्षकांचे खास पारितोषिक मिळविले होते. याच चित्रपटातील गाण्यासाठी सुरेश वाडकर यांना सवरेत्कृष्ट पाश्र्वगायक यांना पुरस्कार. हंसराज जगताप (धग) हा सवरेत्कृष्ट बाल कलाकार ठरला होता.   
* २०११ : ‘देऊळ’, ‘शाळा’ आणि ‘बालगंधर्व’ या तीन चित्रपटांना एकूण आठ पुरस्कार.  * २०१२: रत्नाकर मतकरी दिग्दर्शित ‘इन्व्हेस्टमेंट’ हा चित्रपटही सवरेत्कृष्ट चित्रपट ठरला होता. ‘धग’ या चित्रपटासाठी उषा जाधव हिला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा तर शिवाजी लोटण-पाटील यांना सवरेत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार. सवरेत्कृष्ट संगीतकार म्हणून शैलेंद्र बर्वे यांनाही पुरस्कार .
* २०१२: ‘अनुमती’ या चित्रपटासाठी विक्रम गोखले यांना सवरेत्कृष्ट अभिनेता तर ‘संहिता’ या चित्रपटासाठी आरती अंकलीकर- टिकेकर सवरेत्कृष्ट पाश्र्वगायिका.