प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम आणि तेलुगु स्टार राम चरण Ram Charan एका चित्रपटासाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगल्या होत्या. त्यानंतर हे दोघेहीजण याच चित्रपटासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची Aishwarya Rai Bachchan निवड करण्याच्या विचारात आहेत. त्यासाठी त्यांनी ऐश्वर्याशी संपर्क साधल्याचेही कळते.

वाचा : सर्वात सुंदर कोण, आई की मुलगी?

मणिरत्नम Mani Ratnam यांच्या १९९७ साली आलेल्या ‘इरुवर’ या राजकीय चित्रपटातून ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात ती सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत झळकली होती. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. अभिषेक बच्चनसोबत केलेल्या ‘रावण’ या चित्रपटासाठी तिने रत्नम यांच्याकरिता शेवटचे काम केले होते. हा बहुभाषिक चित्रपट २०१० साली प्रदर्शित झाला होता. चरणने काही दिवसांपूर्वीच रत्नम त्याच्यासोबत काम करण्यासाठी इच्छुक असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून हे दोघेही चित्रपटाबद्दल चर्चा करत आहेत. त्याचसोबत चरणने त्याच्या अभिनयातही काही बदल आणायला हवेत, असा सल्ला रत्नम यांनी त्याला दिला होता. त्यामुळेच त्याने गेल्या वर्षी ‘ध्रुवा’ हा हटके चित्रपट केला. मणिरत्नम यांच्याशी ऐश्वर्याचे खूप चांगले मैत्रीपूर्ण संबंध असल्याने कदाचित ती राम चरणसोबत चित्रपट करु शकते. त्यामुळे ऐश्वर्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या लाडक्या अभिनेत्रीला रुपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

वाचा : ‘कान’मध्ये ऐश्वर्यापेक्षा आराध्याचीच चर्चा

चरणचा ‘ध्रुवा’ चित्रपट चांगलाच गाजत आहे. सध्या या चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत असलेल्या राम चरणने म्हटले की, एकदा मणी रत्नम आणि माझी भेट झाली होती. तेव्हा ते मला म्हणालेले तू एक मोठा स्टार आहेस. तुला मार्केटची चिंता करण्याची गरज नाही. तरीही तू चित्रपटाच्या विक्रीची चिंता का करतोस. माझ्यासोबतचा चित्रपट तुझ्या करिअरला वेगळी कलाटणी देईल. या चित्रपटातून तुला कलेक्शन नाही मिळणार पण प्रसिद्धी नक्कीच मिळेल. त्यामुळे यापुढे तू जे काही चित्रपट स्वीकारशील ते नीट विचार करून कर.

दरम्यान, ऐश्वर्याचे कान चित्रपट महोत्सवातील लूक बरेच नावाजले गेले. आपल्या लाडक्या लेकीसोबत म्हणजेच आराध्यासोबत यंदा ती गेली होती. प्रिन्सेस गाऊनमधील ऐश्वर्याच्या लूकला कानमधील फॅशन पोलिसांनीही पसंती दिलेली.