सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्यां नात्याबद्दल नेहमीच नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. चाहत्यांचे ‘फेवरेट कपल’ म्हणून सिद्धार्थ आणि आलिया यांच्याकडे पाहिले जाते. या दोघांनी ‘स्टुडंट ऑफ दि इयर’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. पण नुकतेच त्यांच्यात आलेल्या दुराव्याने खरेच ते एकमेकांपासून दूर गेले आहेत की इतर गोष्टींप्रमाणे ही एक अफवा आहे असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला.

एका सूत्राने वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, ‘या दोघांनी कायमस्वरुपी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आधीप्रमाणे त्यांच्यात भांडण होऊन ते आता पुन्हा एकत्र येतील असे नाही. यापुढे ते कधीच एकत्र येणार नाहीत. सध्या हे दोघंही एकमेकांसमोर न येण्याचा प्रयत्न करतायेत. कदाचित भविष्यात त्या दोघांमध्ये मैत्री होईलही पण सध्या तरी तशी काही चिन्ह दिसत नाहीत. या दोघांमधला वाद इतक्या विकोपाला गेला होता की त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.’

सिद्धार्थला जेव्हा त्याच्या ब्रेकअपबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला की, ‘आलिया आणि माझा ब्रेकअप झालाय? कशासाठी? टेबल आणि खुर्च्या तोडण्यासाठी?’ सिद्धार्थच्या या उत्तरावर आपले मत देण्याची आलियाची वेळ होती. आलिया सध्या मेघना गुलझार यांच्या ‘राझी’ सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.

sidharth, alia
सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट

सिद्धार्थप्रमाणे तिलाही हाच प्रश्न विचारण्यात आल्यावर ती म्हणाली की, ‘मला याबद्दल काहीच माहित नाही. माझ्या ब्रेकअपच्या बातम्या मी पटियालामध्ये येण्यापूर्वीपासून सुरू झाल्या होत्या. सध्या माझ्यासोबत सगळं चांगलं सुरू आहे. ब्रेकअपबद्दल बोलायचे झाले तर मी त्या संभाषणाचा कधी भागच नव्हते. पण सध्या तरी काही दिवसांसाठी माझ्या आयुष्यात ब्रेक-अप, मेक-अप किंवा लिंक-अप नाहीये. सध्या मी फक्त माझ्या आगामी ‘राझी’ सिनेमाचा विचार करतेय.’ ‘राझी’ सिनेमात आलियासोबत विकी कौशल यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ११ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.