बॉलीवूड सुंदरी ऐश्वर्या राय बच्चन ही गेली १५ वर्षे कान महोत्सवात हजेरी लावतेय. तिचे सौंदर्य आणि अदा याचे करोडो चाहते आहेत. कानमधील तिच्या लूकची नेहमीच माध्यमांमध्ये चर्चा असते. यंदा पहिल्या दिवशी कानच्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या गोल्डन ड्रेसमध्ये अवतरली आणि तिने अनेकांना घायाळ केले. पण त्यानंतरच्या तिच्या एका लूकने नेटिझन्सना चर्चेचा विषय दिला. ऐश्वर्याचा हा लूक नेहमीपेक्षा एकदम वेगळा होता. मेकअपमध्येही ऐश्वर्याचे सौदर्य खुलून दिसते पण यावेळी ऐश्वर्याची लिपस्टिकच जास्त उठून दिसत होती. सगळ्यांच्या नजरा तिच्या सौंदर्याऐवजी पर्पल ओठांवर केंद्रीत झाल्या. ऐशने जांभळ्या रंगाची लिपस्टीक लावली होती. यावर टि्वटरवरुन वेगवेगळया प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या. काहींनी तिच्या पर्पल लिप्सची प्रशंसा केली तर काहींनी टीका.
ऐश्वर्याचा पती अभिषेक बच्चन याने ऐश्वर्या पर्पल लिप्समध्ये सुंदर दिसत होती, असे सांगून तिची पाठराखण केली. त्यानंतर आता ऐश्वर्याचे सासरे म्हणजेच अमिताभ बच्चन यांनीही सूनेच्या पर्पल लिप्सवर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत अमिताभ यांना ऐश्वर्याचे पर्पल लिप्स आणि त्यावर होणारी टीका याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की,  त्यात गैर काय? असा उलट प्रश्नं त्यांनी प्रश्न विचारणा-यांना केला. सोशल मीडियाने प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी दिली आहे. यापूर्वी ही संधी नव्हती. लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, हे आपल्याला याआधी कळत नव्हते. निदान त्यामुळे आता आपल्याला हे समजू शकते, असे ते म्हणाले.