बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन नेहमीच लोकांना हाताने पत्र लिहून पाठवतात. कंगना राणौत आणि रणवीर सिंग यांना त्यांनी स्वहाताने लिहिलेले पत्र पाठवले होते. यात अमिताभ यांनी कंगना आणि रणवीरच्या सिनेमातल्या अभिनयाचे कौतुक केले होते. आता त्यांनी परत एकदा प्रशंसा करणारे पत्र लिहिले आहे. पण हे पत्र कोणत्याही बॉलिवूड कलाकारासाठी नाही तर टीव्ही कलाकार नकुल मेहता याच्या वडिलांना बिग बींनी हे पत्र लिहिले आहे.

इश्कबाज फेम नकुल मेहताने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे पत्र शेअर केले आहे. अमिताभ यांनी लिहिलेल्या त्या पत्रातील शब्दांमुळे तो सध्या फार खूश आहे. फार कमी लोकांना हे माहित आहे की नकुलचे वडील कमांडर प्रताप सिंग मेहता हे भारतीय सैन्याचा एक भाग आहेत. नकुलच्या वडिलांना सन्मानित करत अमिताभ यांनी हे पत्र लिहिले आहे. हे पत्र इन्स्टाग्रामवर शेअर करताना नकुलने लिहिले की, जेव्हा दिग्गज अमिताभ बच्चन जेव्हा तुमच्या बाबांच्या कॉफी टेबल बुकसाठी पत्र लिहितात… राजपुताना क्रोनिकल्स गन्स अॅण्ड ग्लोरिज.

नकुल सध्या इश्कबाज या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. त्याच्या या मालिकेतील भूमिकेला अनेकांनी पसंतीही दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह एका पार्टीला उपस्थित राहिले होते. पण, तिथे जो प्रकार घडला त्याने ऐश्वर्या काहीशी नाखूश झाल्याचे म्हटले जातेय. ऐश्वर्याने छायाचित्रकारांना फोटो काढण्यासाठी पोज दिली असता सर्व छायाचित्रकार तिचे फोटो काढायचे सोडून लगेच बिग बींचे फोटो काढण्यासाठी धावले. या गोष्टीने नाराज झालेली ऐश्वर्या पार्टीत न जाताच तेथून घरी परतली. हिंदुस्थान समाचार या संकेतस्थळाने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

अमिताभ बच्चन यांची बॉलीवूडमध्ये असलेली प्रसिद्धी सर्वज्ञात आहे. पण, घरात जया बच्चन यांचेच राज्य असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे ब-याचदा ऐश्वर्याचे चालत नाही. याचेच उदाहरण जज्बा चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी पाहावयास मिळाले. स्क्रिनिंगवेळी ऐश्वर्याने तिच्या आई-वडिलांना मंचावर बोलावून त्यांचा आशीर्वाद घेतला होता आणि त्यांचे आभारही मानले होते. पण, त्याचवेळी बाजूला बसलेल्या सासू सास-यांकडे तिने दुर्लक्ष केले होते.