‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील गाण्यांनी प्रत्येक सिनेरसिकाच्या मनामध्ये एक विशेष स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटातील ‘पिंगा’, ‘गजानना’ आणि ‘दीवानी मस्तानी’ गाण्यांनी प्रेक्षकांची प्रशंसा मिळविली आहे. त्यानंतर आता ‘मल्हारी’ हे विजयगीत प्रदर्शित करण्यात आले आहे.
या गाण्याचे चित्रीकरण मोठ्या स्तरावर करण्यात आल्याने चित्रपटातील संपूर्ण टीमला विशेष मेहनत घ्यावी लागली. ‘मल्हारी’ या गाण्यात बाजीराव पेशवे यांचे शौर्य आणि विजयी जल्लोष दाखवण्यात आलायं. अभिनेता रणवीर सिंगने कित्येक दिवसांच्या सरावानंतर गाण्याचे चित्रण पाच दिवसांत पूर्ण केले. ‘मल्हारी’ विजयगीताचे बोल ‘दुश्मन ची वाट लावली’ हे आहेत आणि हे गीत बाजीराव पेशवे शत्रूवर विजय मिळवून जेव्हा घरी येतात त्यानंतर चित्रीत करण्यात आलेय. ‘मल्हारी’ गीतास विशाल ददलानीने गायले असून, गणेश आचार्यने त्याचे नृत्य दिग्दर्शन केलेयं. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणे या गाण्यासही तितकीचं प्रशंसा मिळते की ‘पिंगा’ गाण्याप्रमाणे यासही लोकांच्या टीकेस सामोरे जावे लागेल हे लवकरच कळेल.
इरॉस इंटरनॅशनल आणि संजय लीला भन्साळी निर्मित ‘बाजीराव मस्तानी’ १८ डिसेंबर रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

Why did Lawrence Bishnoi gang fire outside Salman Khans house What is the extent of this gang
लॉरेन्स बिष्णोई टोळीने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार का केला? या टोळीची व्याप्ती किती? पुन्हा हल्ला करण्याची धमकी किती गंभीर?
46 lakhs in the bungalow and house of the corrupt Tehsildar
नोटांचे ढीग पाहून एसीबी अधिकारीही चक्रावले; लाचखोर तहसीलदाराच्या बंगला व घरात ४६ लाखाचे घबाड, कॅश मोजायला…
Chhatrapati and Mandlik family face to face again after 15 years in Kolhapur Lok Sabha constituency
कोल्हापुरात छत्रपती-मंडलिक घराणे १५ वर्षांनंतर पुन्हा समोरासमोर
uddhav thackeray marathi news, shrimant shahu maharaj chhatrapati kolhapur marathi news
कोल्हापूरचे छत्रपती – ठाकरे घराण्यातील जिव्हाळा कायम