टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १०’ मधून बाहेर काढल्यानंतरही स्वामी ओम काही शांत बसण्याचे नाव घेत नाहीत. ते प्रत्येक दिवशी असे काही वक्तव्य करतात की त्यामुळे अनेक चर्चांना उधाण येते. काही दिवसांपूर्वी स्वामी एका मुलाखतीसाठी वृत्त वाहिनीत गेले होते. तेथे त्यांनी सलमान खानला एड्स असल्याचा दावा केला आहे. सलमानला एड्स असल्यामुळेच तो लग्न करत नसल्याचा त्यांनी दावा केला आहे.

त्यांच्या विधानातच किती विरोधाभास आहे हे त्याच्या नंतरच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होते. एकीकडे सलमानला एड्स असल्यामुळे तो लग्न करत नाही असे बोलणारे स्वामी दुसरीकडे सलमानने लपून लंडनमध्ये लग्न केले आहे आणि त्याला मुलगीही आहे असा दावा त्यांनी केला आहे.
स्वामी ओम यांना ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर काढण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी एका टीव्ही चॅनलच्या स्टुडिओमध्ये त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणही झाली होती. याआधीही स्वामी ओम यांनी सलमान खान आणि ‘बिग बॉस’वर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

एका मुलाखतीत स्वामी ओम म्हणाले होते की, जर बिग बॉसने मला २८ तारखेच्या आधी घरात परत घेतले नाही तर मी या शोचा महाअंतिम सामना होऊ देणार नाही. कोणालाच विजेता बनू देणार नाही. कारण मीच विजेता होतो, आहे आणि पुढेही असणार. मीच विजेता आहे हे सिद्ध करण्यासाठी मी सलमान खानलाही मारेन, बिग बॉसलाही मारेन, मी तिथे जाऊन आग लावेन. त्या सगळ्या मुला-मुलींना मी फरफटत बाहेर आणेन आणि पोलिसांकडे देईन. सलमान स्वतः देशद्रोही आहे.

त्याने स्वतः सांगितले आहे की तो दाऊद इब्राहीम, हाफिज सईद, अबु सालेम आणि आयएसआयचा एजंट आहे. ते माझे मित्र आहेत, ते जसे सांगतील तसा मी वागतो. सलमानने हेही सांगितले की, शाहरुख आणि आमिर यांच्यासोबत मिळून हिंदुस्तानला इस्लामिस्तान बनवू पण मी असे काही होऊ देणार नाही.