विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या रिलेशनशिपविषयी प्रत्येत गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहत्यामध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. प्रत्येक गोष्टीत एकमेकांना पाठिंबा देणारे ‘विरुष्का’ लवकरच एक रेस्तरॉ सुरु करणार असल्याची चर्चा आहे.

‘मुंबई मिरर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मुंबईतील वरळी येथे अनुष्काने विराटच्या साथीने एक प्रॉपर्टी खरेदी केली असून, दिल्लीतही त्यांच्या नावे प्रॉपर्टीची खरेदी करण्यात आली आहे. रिलेशनशिपमध्ये भविष्यातील गोष्टींच्या विचार करुन विरुष्काने हा निर्णय घेतल्याची चर्चाही होती. पण, असं काहीच नसल्याचं अनुष्काने ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. ‘हे सर्व खोटं आहे…’ असं म्हणत आपण कोणतंही रेस्तरॉ सुरु करण्याच्या विचारात नसल्याचं स्पष्ट केलं. याशिवाय विराटसोबतच्या नात्याविषयीही ती खुलेपणाने बोलली.

‘मला या गोष्टीबद्दल उघडपणे का बोलायचं नाही आहे, हे स्पष्ट करु इच्छिते. माझ्या रिलेशनशिपविषयी मी कधीही कोणतीच बाब लपवून ठेवली नाही. कारण, ज्या प्रकारे ती गोष्ट मी हाताळत होते, त्याच परिपक्वतेने ती तुम्हीही हाताळाल अशी माझी अपेक्षा होती. पण, ही बाब सर्वांनाच जमत नाही हे माझ्या लक्षात आलं आहे. त्यांना इतर गोष्टींमध्येच जास्त रस आहे. आम्ही भेटलो याकडे सर्वांचं लक्ष असतं. आपण ज्या व्यक्तीला डेट करतो त्यांना भेटणारचं. यात चर्चा करण्यासारखे काय?, किंबहुना चित्रपटांमध्ये मी कितीही चांगला अभिनय केला तरीही माझ्या खासगी आयुष्याविषयीच जाणून घेण्याकडेच सर्वांचा कल आहे’, असं अनुष्का म्हणाली.

https://www.instagram.com/p/BY0qk7eAq0P/

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

विराटसोबच्या नात्याविषयी अनुष्काने बऱ्याच गोष्टी सर्वांसमोर मांडल्या. पण काही बाबतीत आपल्या खासगी आयुष्यालाच जास्त महत्त्व दिलं जात आहे, हे लक्षात येताच तिने सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे.