बॉलिवूड विश्वात ब्रेकअपनंतर फारस कोणी अस्थिर होत नाही. मग ते पहिल ब्रेकअप असो किंवा दुसरे यातुन बॉलिवूडमंडळी सावरते. कतरिनाच्या बाबतीतही काही असेच झाले. रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाचे नाव अदित्य रॉयसोबत जोडले गेले. दोघे बऱ्याचदा एकत्र फिरताना दिसले. त्यांच्या प्रेमाच्या चर्चा देखील रंगल्या. पण सध्या बॉलिवूडमध्ये कतरिनाच्या फेसबुक स्टेटसची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे. स्वत:वर प्रेम असेल तर दुसऱ्याची कोणाची गरज नसते. अशा आशयाचे स्टेटस कतरिनाने शेअर करुन चाहत्यांना एक वेगळा संदेश दिला आहे.

कतरिनाने अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन हे स्टेटस शेअर केले. ‘किसी और की मुझको ज़रूरत क्या’ अशी ओळ लिहून तिने आपला एक फोटो देखील शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती स्वत:ला बाहुपाशात कवटाळताना दिसत आहे. कतरिनाने तीन दिवसांपूर्वी शेअर केलेल्या पोस्टवर अनेक चाहते प्रतिक्रिया देताना दिसते. कतरिनाला नक्की या पोस्टमधून काय सुचवायचे आहे. तिला कोणाची गरज नाही असे म्हणायचे आहे का? किंवा तिला इतर कोणावर प्रेम करण्यापेक्षा स्वत:वर अधिक प्रेम करा, असा सल्ला द्यायचा आहे. अशा अनेक चर्चांना उधान आले आहे.

या आशयाचे पोस्ट शेअर करण्याची कतरिनाची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील तिने अशा प्रकारची पोस्ट शेअर केली होती. ‘काही वेळेला तुम्हाला तुमचीच गरज असते’. असा संदेश  तिने दिला होता. कतरिना अशा पोस्टमधून नक्की कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करते हे कळणे अशक्य आहे. पण तिच्या अशा पोस्टमुळे तिच्या ब्रकअपच्या चर्चांना पुन्हा उधाण नक्कीच येते.
काही दिवसांपुर्वीच कतरिना-रणबीरच्या ब्रेक अपच्या चर्चा समोर आल्या होत्या त्यानंतर कतरिनाने रणबीर बरोबर पुन्हा एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली परंतू, रणबीरने त्यास नकार दर्शवला होता. त्यानंतर कतरिना नाराज असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या.