‘आयुष्य संपल तरी प्रेम मरत नाही’ या कथासूत्रावर सुरु झालेली ‘चाहूल’ मालिका आता खरोखरच त्या वळणावर येऊन पोहचली आहे. निर्मलाला मात दिल्यानंतर आपण सुखाचा संसार करू शकतो असा शांभवी आणि सर्जा यांचा समज होता. त्यांच्या प्रेमाला कोणाचीच नजर लागणार नाही, निर्मला त्यांच्या मार्गामध्ये कधीच येणार नाही असे त्यांना वाटत होते. पण, आता हे सगळे शांभवी आणि सर्जावर उलटले आहे. निर्मलाने सर्जाला कधीही न सोडण्याचा शब्द पाळला आहे. तिने शांभवीचे रूप घेऊन सर्जासोबत संसार सुरु केलाय. यासाठी शांभवीच्या लुकमध्ये बदल देखील करण्यात आला आहे. आता शांभवीच काय होणार? ती सर्जापर्यंत कधी पोहचू शकेल का? निर्मला आणि सर्जा कुठे आहेत याची चाहूल शांभवीला कधी लागणार? हे आता ‘चाहूल’च्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळेल.

वाचा : कचऱ्यात फेकलेल्या मुलीला मिथुन यांनी घेतले होते दत्तक; आता बॉलिवूड पदार्पणसाठी सज्ज

लग्न झाल्यानंतर शांभवीचे रूप घेऊन निर्मलाने सर्जासोबत आपला संसार सुरु केला. शांभवीने कधीच सर्जापर्यंत पोहचू नये यासाठी निर्मलाने तिला दुसऱ्याच मुलीचे रुप दिले आणि ती सर्जासोबत दुसऱ्या गावात निघून आली. दुसरीकडे, मीच खरी शांभवी आहे हे सगळ्यांना कसे पटवून देऊ या द्विधा मनस्थितीत आता शांभवी पडली आहे.

वाचा : ‘डबल रोल’ साकारणारा पहिला कलाकार कोण माहितीये का?

या सगळ्या गोंधळामध्ये शांभवीला सर्जाला देखील वाचवायचे आहे. सर्जाला याची कल्पना देखील नाही की आपल्यासोबत जी पत्नी म्हणून राहतेय ती शांभवी नसून निर्मलाच आहे. सर्जा माझा झाला या विचाराने निर्मला मनातल्या मनात खूप खूश आहे. आमच्या दोघांमध्ये कुणीच येणार नाही असा निर्मलाचा समज आहे. त्यामुळे खरी शांभवी तिच्या सर्जापर्यंत कशी पोहचेल? निर्मलाला शांभवीची चाहूल लागताच ती कोणत नवीन कारस्थान रचेल? हे बघणे रंजक असणार आहे.