सेलिब्रेटी जोडींमध्ये प्रसिद्ध असलेली एक जोडी म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. पण या दोघांच्या नात्यात काहीतरी मतभेद झाल्याचे वृत्त आहे.
मिस मालिनीने दिलेल्या वृत्तानुसार, अनुष्काने विराट कोहलीचा विवाह प्रस्ताव फेटाळल्याचे कळते. विराटला यावर्षी अनुष्कासह विवाहबंधनात अडकण्याची इच्छा आहे. मात्र, अनुष्काला सध्या तिच्या करिअरवर लक्ष्य केद्रीत करायचे आहे. त्यामुळे या दोघांमध्ये मतभेद झाल्याने त्यांच्यातील संवादही कमी झाला. आता हे दोघेही त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात व्यस्त झाले आहेत. बॉलीवूडला अनुष्का-विराटच्या रुपात अजून एक ब्रेकअप पाहावा लागू नये हीच इच्छा.