बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन याचा आगामी चित्रपट ‘काबिल’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ह्रतिकचा हा चित्रपट किंग खानच्या ‘रईस’ या चित्रपटाशी टक्कर घेणार असला तरी, ह्रतिकला आपल्या चित्रपटाच्या यशावर पूर्ण खात्री असल्याचे दिसते. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शाहरुख आपल्या आगामी ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यग्र असताना ह्रतिकने त्याच्या चित्रपटाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केला आहे. ह्रतिकने त्याच्या ‘काबिल’च्या प्रसिद्धीसाठी अनुपमा चोप्रा यांच्या मेजवानी शो मध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ह्रतिकने चित्रपटाचे कथानक पाहूनच मला चित्रपटाचे यश-अपयश लक्षात येते, असे म्हटले. माझ्या पहिल्या चित्रपटापासून आतापर्यंत मी लावलेला अंदाज चुकीचा ठरला नसल्याचा दाखला ही त्याने यावेळी दिला. चित्रपटाचे यश-अपयशच नव्हे, तर चित्रपटावर काय प्रतिक्रिया उमटतील हे देखील खरे ठरते, असे तो म्हणाला.

ह्रतिक रोशनने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून २००० मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाने चांगलीच पसंती मिळाली होती. या कार्यक्रमात ह्रतिकने आपला बॉलिवूड प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. मी बॉलिवूडचा कर्जदार होतो, पण आता मी हे कर्ज फेडले आहे. माझ्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू समोर आल्या आहेत. या दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर मला आता शांती हवी आहे, असे ह्रतिक म्हणाला. अभिनेता ह्रतिक रोशन आणि यामी गौतम काही दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘काबिल’ चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने यामी गौतमी पहिल्यांदा ह्रतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

ह्रतिक रोशनने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून २००० मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाने चांगलीच पसंती मिळाली होती. या कार्यक्रमात ह्रतिकने आपला बॉलिवूड प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला. मी बॉलिवूडचा कर्जदार होतो, पण आता मी हे कर्ज फेडले आहे.  माझ्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही बाजू समोर आल्या आहेत. या दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर मला आता शांती हवी आहे, असे ह्रतिक म्हणाला. अभिनेता ह्रतिक रोशन आणि यामी गौतम काही दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘काबिल’ चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने यामी गौतमी पहिल्यांदा ह्रतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.