करिना कपूर खानबद्दल नेहमीच कुतुहल राहिलं आहे. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव आवर्जुन घेतले जाते. करिनाने तिच्या आतापर्यंतच करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले. कॅमेऱ्यासमोर नसतानाही प्रकाशझोतात कसे राहायचे याच्या टीप्स तर करिनाकडूनच अनेकांनी घ्यावा. गरोदर असल्यापासून ते तैमुरला घेऊन बाहेर जाण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी तिच्यामागे छायाचित्रकारांची फौज असतेच.
तैमुरच्या जन्मानंतर तिने आता पुन्हा सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी ती अनेकदा दिल्ली- मुंबई वाऱ्या करताना दिसते.

तैमुर अली खान

पण तुम्हाला माहीत आहे का, सैफ अली खानशी लग्न करण्यासाठी तिला फार मेहनत घ्यावी लागली. करिनाने तिचे सैफसाठीचे प्रेम घरी सांगितल्यावर तिला प्रचंड प्रमाणात विरोध करण्यात आला. करिनाने अनेक पद्धतीने घरच्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तिचे प्रयत्न फळाला येत नव्हते. म्हणून अखेरीस करिनाने घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

लग्न करेन तर सैफशीच नाहीतर कुणाशीच नाही. जर तुम्ही माझं सैफसोबत लग्न करुन दिले नाही तर मी घरातून पळून जाईन, असे करिनाने आपल्या आई- वडिलांना ठामपणे सांगितले होते. शेवटी मुलीच्या हट्टापुढे घरच्यांना नमते घ्यावेच लागले. नाईलाजास्तव का होईना पण शेवटी आई- वडिलांनी करिना आणि सैफच्या लग्नाला होकार दिला आणि ते लग्नाच्या बेडीत अडकले.

सैफ, करिना आणि तैमुर अली खान

त्यांच्या या सुखी संसारात गेल्या वर्षी एका चिमुकल्याचेही आगमन झाले. तैमुरच्या येण्याने या दोघांचे कुटुंब पूर्ण झाले असेच म्हणावे लागेल. आता तर सैफ आणि करिना या दोघांपेक्षाही त्यांचा मुलगा तैमुर जास्त चर्चेत असतो.