प्रेम कधी कोणावर आणि कसं होईल याची कधीच शाश्वती नसते. पण ते जेव्हा होत तेव्हा त्या व्यक्तिशिवाय इतर काहीही सुचत नाही. अनेकादा तुम्ही तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटता. तेव्हा त्याचा सहवास तुम्हाला हवाहवासा वाटतो. पण तुमच्या मनात ही भावना का येत असते याचे उत्तर अनेकांना मिळत नाही. असंच काहीस कपिल आणि गौरीचं झालं आहे. यामागचं कारण आता त्यांना एकमेकांना उमगलंय …

गौरीला कपिल आवडत होताच पण कपिलची चलबिचल होत होती. आणि शेवटी जेव्हा सौरभ त्या दोघांमध्ये आला तेव्हा मात्र कपिलला तो गौरीवर किती मनापासून प्रेम करतो हे उमगून आलं. पण आता त्याला हे कळत नाही आहे की गौरी त्याच्यावर प्रेम करतेय की सौरभ वर …  त्यामुळे आता या पठ्ठयाला गौरीला प्रपोज करायचंय आणि त्यासाठी रामाश्रय मध्ये संपूर्ण तयारी केलीय. हिंदी सिनेमांपेक्षाही जास्त रोमॅण्टिक असं रामाश्रय कपिलने सजवलंय. लाल लाल रंगाचे हार्ट चे फुगे, कॅण्डल लाईट्स … सॉफ्ट म्युझिक …  लाल रंगीत पडदे …. गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेलं रामाश्रय आणि साथीला रामाश्रयची सर्व मंडळी. आणि हो मुहूर्त आहे गौरीचा वाढदिवस.

कपिल गौरीला प्रपोज करतोय …. जसं एका मुलीला हवं असते तस्स … गुडघ्यावर बसून …गौरीच्या डोळ्यात डोळे घालून …. प्रेमाने तिचा हात हातात घेऊन … आणि आता सगळ्याचे लक्ष आहे गौरीच्या उत्तराकडे … तुम्हालाही हे प्रेमाचे क्षण अनुभवायचे असतील तर त्यासाठी झी युवावरील इथेच टाका तंबू ही मालिका पाहावी लागेल.