‘अन्न हे पूर्णब्रम्ह’ असं म्हणतात हे योग्यचं आहे. नवे खमंग, चविष्ट, खुसखुशीत असे पदार्थ खायला कुणाला आवडत नाही. खरतर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी अन्नावर प्रेम असावे लागते तरच त्या पदार्थांवर न्याय होतो. बऱ्याच लोकांना खाण्याची आवड नसून दुसऱ्यांना वेगवेगळे पदार्थ बनवून देण्याची आवड असते. पण एखादा पदार्थ चांगला आहे की वाईट याची पारख एक उत्तम खवय्याच करू शकतो. कलर्स मराठी अश्याच खवय्यांसाठी एक रुचकर कार्यक्रम घेऊन येत आहे. ‘आज काय स्पेशल’ हा कार्यक्रम २५ ऑगस्टपासून दुपारी १.३० वाजता तुम्हाला पाहता येईल.

एखादा पदार्थ चांगला होण्यासाठी सर्जनशीलता आणि मेहेनतीची गरज असते. तसेच प्रेक्षकांना आपलसं करण्यासाठी देखील या दोन्ही गोष्टींची सांगड असणे खूप महत्वाचे असते. या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला देखील या दोन्हींची उत्तम सांगड असलेले, आपल्या दर्जेदार अभिनयाने मराठी माणसाशी अतूट नातं जोडलेले तसेच ज्यांना उत्तम चवीची जाण आहे असे सगळ्यांचे लाडके प्रशांत दामले प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. प्रशांत दामले महाराष्ट्रातील खवय्यांच प्रतिनिधीत्व करणार आहेत.

वाचा : कचऱ्यात फेकलेल्या मुलीला मिथुन यांनी घेतले होते दत्तक; आता बॉलिवूड पदार्पणसाठी सज्ज

एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहचण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असे म्हणतात. हा कार्यक्रम बघून तुम्ही देखील तुमच्या जवळच्या माणसांसाठी वेगवेगळे पदार्थ करून त्यांची मनं जिंकू शकता. या कार्यक्रमामधून प्रेक्षकांना रुचकर आणि चविष्ट पदार्थ एका नव्या रुपात, नव्या पद्धतीने शिकण्याची वा प्रेक्षकांना दाखविण्याची संधी मिळणार आहे. कार्यक्रमामध्ये विविध प्रांतातील पाककृती एका नव्या अंदाजमध्ये बघायला मिळणार आहे . आपण आजवर अनेक पदार्थ खात आलो पण याच पदार्थांना नवीन पद्धतीने कसे करावे, कशी त्यांची चव वा तो पदार्थ रुचकर करावा, कसे त्यांना खुशखुशीत पद्धतीने सादर करावे हे कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

वाचा : हा प्रसिद्ध अभिनेता लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

या कार्यक्रमाबद्दल प्रशांत दामले म्हणाले की, ‘श्वास घेणं जितक महत्वाचं आहे तितकचं महत्वाच खाणं देखील आहे. आयुष्यातील ही एक अविभाज्य गोष्ट आहे असे मी म्हणेन. प्रत्येक माणूस त्या त्या वयाप्रमाणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने खात असतो. वयोपरत्वे त्याच्या खाण्याच्या पद्धती देखील बदलत असतात, पण म्हणून खाण कधीच व्यर्ज होत नाही. कुठल्याही वयात जितक्या पद्धतीच खाता येईल तितका जीवनाचा प्रवास सुखकर होतो. या घटकाशीच संबंधीत हा कार्यक्रम असल्यानेच मी हा कार्यक्रम करतोय’.