सध्या सर्वत्र गोलमाल अगेन या चित्रपटाची चर्चा होत आहे. या चित्रपटाशी निगडीत असलेल्या छोट्या गोष्टीदेखील वाऱ्याच्या वेगासारख्या सर्वत्र पसरत असल्याचे पहायला मिळतेय. ‘गोलमाल सीरिज’मधला हा चौथा चित्रपट ऐन दिवाळीत प्रदर्शित होत असल्यामुळे सिनेचाह्त्यांसाठी तो ‘सोने पे सुहागा’ ठरत आहे. अश्या या ‘गोलमाल अगेन’ चित्रपटाच्या सेटवरील पहिल्या दिवसाची गोष्ट नुकतीच श्रेयस तळपदे याने एका मुलाखतीत प्रसारमाध्यमांना सांगितली.

वाचा : सूरज पांचोलीसोबत काय करतेय धोनीची ऑनस्क्रीन पत्नी?

पहिल्याच दिवशी दिग्दर्शक रोहित शेट्टीने सगळ्यांना आपापल्या व्यक्तिरेखांचा सराव करायला सांगितला होता. परंतू कोणीही त्यासाठी उत्साही दिसत नव्हते. त्यावेळी रोहितने अजय देवगण, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि कुणाल खेमू यांना आपल्याला यावेळी पूर्वीच्या ‘गोलमाल’पेक्षा सुपरहिट कॉमेडी करायची असल्याचे सांगितले. अपेक्षित असलेला उत्साह रोहितला टीममध्ये दिसून येत नसल्यामुळे, त्याने लगेचच ‘गोलमाल ३’ च्या स्क्रीनची व्यवस्था केली. त्यानंतर अर्धा तास त्याने यावर चर्चादेखील केली.

वाचा : सुमोना चक्रवर्तीच्या वडिलांना रिक्षावाल्याने मारले, प्रकृती गंभीर

‘गोलमाल ३’ पाहिल्यानंतर प्रत्येकाला आपापल्या पात्रांची चांगलीच उजळणी झाली. त्यामुळे पुन्हा एकदा तब्बल सात वर्षानंतर तिच पात्र नव्या जोमाने वठवण्यास आम्ही सगळे तयार झालो, असे श्रेयसने सांगितले. ‘गोलमाल अगेन’च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली, त्यावेळी आम्ही सात वर्षानंतर शूट करतोय असे वाटलेच नाही. रोहितने दिलेल्या प्रेरणेमुळे गेल्याच आठवड्यात ‘गोलमाल ३’चे शूट पूर्ण झाले आणि आता आम्ही सर्व ‘गोलमाल अगेन’ला सुरवात करतोय अस वाटून गेले, असे देखील श्रेयसने पुढे सांगितले.