बॉलिवूडमध्ये असे म्हटले जाते की सलमान खानची मैत्री जेवढी चांगली तेवढंच वाईट त्याच्याशी वैर घेणं. सलमानच्या मनातून जो एकदा उतरतो, त्याला परत त्याच्या मनात तेच स्थान मिळेलच असे नाही. अभिनेता अर्जुन कपूरसोबतही काहीसे असेच झाले आहे.

झाले असे की, अर्जुनने एआयबी या शोमध्ये सलमानची बहिण अर्पिताची मस्करी केली होती. अर्पिता आणि अर्जुन रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांचे प्रेमभंग झाल्यानंतर अर्जुनने सार्वजनिक कार्यक्रमात अर्पिताची खिल्ली उडवली होती. यावरुनच सलमानने अर्जुनसोबत लांब राहण्याचा निर्णय घेतला.काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये सानिया मिर्झाच्या बहिणीच्या संगीत कार्यक्रमाला सलमान, अर्जुन असे अनेक बॉलिवूड कलाकार आले होते. यावेळी सलमान, अर्जुनपासून दूरच राहताना अनेकांनी पाहिले.

अर्जुन आणि सलमानमध्ये गेल्या दोन वर्षांपासून काहीच बोलणे होत नाही. सध्या याविषयी चर्चा रंगत आहे की, अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा खान यांच्यामध्ये आलेल्या दुराव्याचे कारणही अर्जुनच आहे. आता सलमान, अर्जुनवर अर्पिताच्या मुद्यावरुन रागावला आहे की, अजून काही वेगळी गोष्ट आहे हे तर त्यांनाच माहित. आता बॉलिवूडमधले हे कलाकार कधीपर्यंत एकमेकांशी न बोलता राहतात तेच बघावं लागेल.

दरम्यान, बिग बॉस वीकेन्ड का वार एपिसोडमध्ये तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींवरून सलमानने स्वामीजींचा चांगलाच क्लास घेतला. मुलींनी तोकडे कपडे घालण्यावरून जर त्यांचे आई-वडिल, भाऊ-बहिण, नवरा यांची काहीच हरकत नाही तर तुम्हाला यावर बोलण्याची काय गरज आहे. तुमच्यासारख्या लोकांमुळेच मुलींना असुरक्षित वाटते. मुलींनी तोकडे कपडे घालण्यात काहीच गैर नाही, असे सलमान म्हणाला. सलमानच्या या वक्तव्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवून त्याची प्रशंसा केली. यानंतर स्वामी ओम यांनी माफी मागत म्हटले की, मी अशा वातावरणातून आलोय जिथे हे सर्व चुकीचे मानले जाते.