सरस्वतीच्या जीवाला धोका…

कलर्स मराठी वाहिनीवरील सरस्वती मालिकेमध्ये आजवर सरस्वतीच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडल्या. काही वाईट तर काही चांगल्या. प्रेक्षकांची खास पंसती नेहमीच या मालिकेला मिळत आलेली आहे. सरस्वतीने आजवर अनेक अडचणींना खंबीरपणे उत्तर दिले. आपल्या माणसांच्या पाठीशी ती नेहेमीच उभी राहिली आहे. मोठे मालक म्हणजेच राघवच्या मनात देखील सरुने अबाधित स्थान निर्माण केले. तिने घरात तिची महत्त्वपूर्ण जागा निर्माण केली. पण सध्या वाड्यात अनेक गोष्टी घडत असून, सरस्वतीला देखील थोड्या आश्चर्यकारक वाटत आहेत. वाड्यामध्ये अनेक वेगवेगळे चेहरे आले आहेत ते कोण आहेत ? त्यांचा हेतू काय आहे ? सरस्वतीच्या जीवाला धोका तर नाही ना? यामधून सरस्वती कसा मार्ग काढणार ? असे अनेक प्रश्न सरस्वतीच्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर करणार यात वाद नाही. पण या सगळ्या प्रश्नांचा उलगडा लवकरच प्रेक्षकांसमोर होणार आहे.

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
168 th prakat din, Shri Swami Samarth Maharaj, Celebrated with Devotion, bhakts, akkalkot, marathi news,
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये भाविकांची मांदियाळी
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू
( Accident near Ambajogai Waghala Pati in Beed )
अपघातात नियोजित नवरदेवासह बहीण, भाची ठार; मृत रेणापूरजवळचे, अंबाजोगाईनजीकची दुर्घटना

नुकतीच वाड्यामध्ये रखमा आणि राधाची एण्ट्री झाली आहे. त्यांचे हेतू काही बरे नाहीत अशी शंका सरुच्या मनात आली आहे. त्यात सरुच्या जीवालाही आता धोका आहे. सदानंद काळे नावाचा शुटर सरस्वतीला मारण्यासाठी वाड्यामध्ये आला आहे. रखमाचे पात्र उषा नाईक तर राधाची भूमिका ऋतुजा धर्माधिकारी वठवणार आहे. सदानंद काळेची भूमिका मयूर खांडगे साकारणार आहे.

या सगळ्या घडामोडी आणि गोंधळामध्ये सरस्वती आणि राघव लवकरच दुबईची वारी करणार आहेत असे समजते. सरू आणि राघव पहिल्यांदाच एकत्र बाहेर गावी जाणार असून त्यांच्यासाठी ही ट्रीप खूप महत्त्वाची असणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर सरू आणि राघवच्या आयुष्यात हे क्षण आणि आनंद आला आहे. त्यांना इतका वेळ एकत्र मिळणार आहे. पण त्यांची ही दुबई ट्रीप सुखरूप होईल? सरुला मारण्याच्या हेतूमध्ये सदानंदला यश मिळेल? की खरोखरच सरस्वतीचा मृत्यू होईल? हे लवकरच सरस्वती मालिकेत तुम्हाला पाहायला मिळेल. सरू पहिल्यांदाच तिचे जीवापाड प्रेण असलेल्या राघवसोबत परदेशी जाणार आहे. सरु आणि राघवच्या या सुखी संसाराला कोणाची नजर तर लागणार नाही ना? राघव आणि सरू एकमेकांपासून दुरावले तर जाणार नाही ना ? हे सगळ बघण रंजक ठरणार आहे.