बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आपल्या मस्तीने आणि लोकांची थट्टा करण्यासाठी प्रसिद्ध आहे हे आपल्याला तर सगळ्यांनाच माहित आहे. पण त्याचे हे प्रॅन्क्स किंवा सहकलाकारांची थट्टा मस्करी आजवर आपल्याला केवळ ऐकण्यास मिळाली होती. प्रेक्षकांनी ती कधी पाहायला मिळाली नाही. त्याच्या गंभीर चेहऱ्याच्या मागे त्याचा मस्तीवाला अंदाज नेहमीच लपला जातो.

नुकताच ‘शिवाय’ या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी अजय आणि काजोल ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गेले होते. कपिल शर्मा शोच्या या भागामध्ये अजयच्या व्यक्तिमत्वाचा दुसरा भागही तुम्हाला पाहायला मिळेल. हा भाग प्रदर्शित होईल तेव्हा तर सर्व प्रेक्षक आवर्जुन पाहतीलच. पण, अजयने त्याआधीच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल आणि चंदू चहावाला यांच्यासोबत अजय एक खेळ खेळताना दिसत आहे. या खेळात त्यांना त्यांच्या पॅन्टच्या पट्ट्यामध्ये ग्लास ठेवायचे आहे आणि एक नाणं डोक्यावर ठेवायचं आहे. नाणं हळूहळू डोक्यावरुन घसरत बरोबर त्या ग्लासमध्येच पडलं पाहिजे अशा धाटणीचा हा खेळ होता. सगळ्यात आधी हा खेळ अजयने खेळून दाखवला. अजयनंतर कपिलने हा गेम खेळण्याचा प्रयत्न केला. कपिलपर्यंत हा खेळ दोघांनीही नीट खेळला. पण जेव्हा चंदूची हा खेळ खेळण्याची वेळ आली तेव्हा प्रेक्षकही उत्साहात येऊन चंदूला चिअर करत होते. चंदूला ते नाणे डोक्यावरुन हळूहळू खाली आणायला कपिल मदत करत होता तेव्हाच संधी साधून अजयने त्या ग्लासमध्ये पाणी ओतलं. यामुळे चंदूची पॅन्ट भिजली आणि एकच हशा पिटला.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

अजय देवगणने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, ‘आजवर ज्यांनी मी खोडी करणारा असल्याचे ऐकले होते. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ.’ अजय देवगणचा शिवाय २८ तारखेला प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी करण जोहरचा ऐ दिल है मुश्किल हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमात ऐश्वर्या आणि रणबीरची जबरदस्त केमिस्ट्रीही पाहता येणार आहे.