द कपिल शर्मा शो या कॉमेडी शोच्या २२ ऑक्टोबरमध्ये ‘ऐ दिल है..’ मुश्किल सिनेमाचे कलाकार सिनेमाच्या प्रमोशनसाठी गेले होते. या शोमध्ये सगळ्यात आधी ऐश्वर्या राय- बच्चनने दमदार एन्ट्री घेतली. कपिल यावेळी म्हणाला की, ऐश्वर्या एवढी सुंदर दिसते की खुद्द प्रिती झिंटाने ऐश्वर्यावर क्रश आहे असे सांगितले होते. यावर ऐश्वर्या बोलली की, प्रिती तिची खूप जवळची मैत्रिण आहे. तिने सांगितले की तिच्या या सौंदर्याचे श्रेय अनेकांना जातं. कपिलने यावेळी ऐश्वर्या रायशी फ्लर्टिंग केली तिकडेच त्याने तिच्या हेअर स्टाइलिस्टशीही फ्लर्टिंग केली.

ऐश्वर्याला जगातला सगळ्यात हॅण्डसम मुलगा कोण वाटतं असा प्रश्न कपिलने विचारल्यावर तिने अभिषेकचं नाव घेतलं. यानंतर रणबीर कपूरची एन्ट्री झाली. रणबीर आणि ऐश्वर्याचा पहिला सिनेमा हा ‘ऐ दिल है..’ नसून ‘आ अब लौट चले’ होता. रणबीर ‘आ अब लौट चले’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक होता. ऐश्वर्या आणि रणबीरने यावेळी त्यांचे काही अनूभवही शेअर केले. त्यावेळी रणबीरने दहावीची परीक्षा दिली होती.

रणबीरने यावेळी त्याचे दहावीतले गुणही सांगितले. त्याला दहावीत ५४.३ टक्के गुण मिळाले होते. त्याच्या या गुणांवर ऐश्वर्या म्हणाली की, मला एवढ्या वर्षांपर्यंत त्याचे गुण माहित नव्हते. हॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शकांबद्दल बोलताना रणवीर म्हणाला की, हॉलिवूड डायरेक्टर क्विन टिन टैरेंटिनोने सेटवर रणबीरला पूर्णपणे दुर्लक्षित केले होते. नटालिया पोर्टमैननेही त्याला एकदा इथून निघून जा असे म्हटले होते.

या शोमध्ये सगळ्यात शेवटी अनुष्का शर्मा आली. पॅरिसमध्ये शूटिंगचा अनुभव सांगताना ती म्हणाली की, पॅरिसमध्ये सगळ्यात जास्त खरेदी रणबीर करायचा. रणबीर मुलांचा सोनम कपूर आहे असेही ती म्हणाली. कपिलने यावेळी रणबीर बरोबर रॅपिड फायरचा खेळही खेळला. रणबीर म्हणाला की, मी खूप लाजाळू आहे. मी स्वतः कमी व्यक्त होतो. यावर कपिल म्हणाला की, तू जेवढा लाजाळू आहेस तेवढेच तुझे बाबा स्पष्ट व्यक्ते आहेत. ऐश्वर्या, रणबीर आणि अनुष्काने यावेळी कजरारे या गाण्यावरही नृत्य केले. यावेळी ऐश्वर्याने डॉक्टर गुलाटीसोबतही खूप मजा मस्ती केली. ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा येत्या २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.