अमिताभ बच्चन यांच्या घरची दिवाळी पार्टी नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण यंदा बच्चन कुटुंबीय कोणतेच सण साजरे करणार नाहीत. याचे कारण म्हणजे याच वर्षी मार्च महिन्यात ऐश्वर्या राय बच्चनचे वडिल कृष्णराज राय यांचे कर्करोगाने निधन झाले. राय कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत बच्चन कुटुंबियांनीही एका वर्षाचा दुखवटा पाळला आहे. दमदार दिवाळी पार्टीऐवजी बच्चन कुटुंब एकमेकांसोबत वेळ घालवणार आहेत. दिवाळी पार्टीच काय तर अमिताभ यांनी आपला वाढदिवसही जल्लोषात साजरा केला नाही. बिग बींच्या वाढदिवसाला संपूर्ण कुटुंब मालदीवला गेले होते. वडील कृष्णराज राय कर्करोगाने पीडित होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण कर्करोग बळावल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याव्यतिरिक्त बऱ्याच घडामोडी कलाविश्वात घडत आहेत. हरियाणातील गायिका हर्षिता दलियाची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून आरोपी अजूनही फरार आहेत. शिवाय टायगर जिंदा है सिनेमाचे पहिले पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. चला तर मग, जाणून घेऊ मराठी आणि बॉलिवूड विश्वातील इतर घडामोडी…