‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेची सुरूवात १२ जानेवारी २००९ मध्ये झालेली. भारतात सर्वाधिक काळ चालणाऱ्या मालिकांमध्ये ही मालिका अग्रणी आहे. या मालिकेने नुकतेच २५०० वा भाग पूर्ण केला आहे. मालिकेच्या सुरूवातीला हिना खान (अक्षरा) आणि करण मेहरा (नैतिक) यांच्या मुख्य भूमिका होत्या. पण आता मालिकेने लीप घेतल्यानंतर हिना आणि करणने ही मालिका सोडली. या दोघांची जागा आता त्यांच्या ऑनस्क्रीन मुलांनी अर्था नायरा आणि कार्तिक यांच्या व्यक्तिरेखांनी घेतली आहे.

https://www.instagram.com/p/BAcgP8yKsUb/

हिनाने ही मालिका सोडल्यानंतर लवकरच ही मालिका बंद होईल असे वाटले होते, पण तसे काही झाले नाही. सध्या तरी या मालिकेला दिलीप जोशी आणि दिशा वकानी यांची ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका टक्कर देत आहेत. या मालिकेने आतापर्यंत २३१४ भाग पूर्ण केले आहेत. आधी ‘बालिका वधू’ आणि ‘साथ निभाना साथिया’ या मालिकांनी २००० भाग पूर्ण केले होते. आता ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेत नक्ष आणि किर्ती यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू असून या लग्नात अनेक अडथळे आल्याचे दिसत आहे. सध्या हिना खान ‘बिग बॉस’च्या घरात असून ती हे पर्व जिंकू शकते असे म्हटले जात आहेत. अनेक आरोप- प्रत्यारोपनंतरही हिनाने आपले घरातील स्थान पक्के ठेवले आहे.

https://www.instagram.com/p/BAfNShiKsaZ/