भिवंडी येथील कोंबडपाडा भागात बुधवारी दुपारी अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला असून त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. गणेश जाधव (१८), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. बुधवारी सकाळी तो वडिलांसोबत कल्याण येथील काळा तलाव भागात नातेवाईकांकडे उत्तर कार्याच्या कार्यक्रमासाठी गेला होता. दरम्यान, तेथून दुपारी परतल्यानंतर तो घरी एकटाच होता. त्यावेळी त्याने घरातील पंख्याच्या हुकाला साडी बांधून गळफास घेतला.