मध्य रेल्वेची रडकथा अजूनही काही संपत नाही असेच चित्र आजही पहावयास मिळत आहे. अंबरनाथ येथे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे रखडली आहे. बिघाड दुरुस्त करण्यात आला असली तरी लोकल धीम्या गतीने जात आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. मात्र, याचा त्रास सकाळीच कामास जाणा-या चाकरमान्यांना सहन करावा आहे.
गेल्याच आठवड्यात दिवा येथे पेंटोग्राफ तुटल्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी संतप्त प्रवाशांनी रेल रोको करत मोटरमनवर हल्लाही केला होता.