मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीतील आसुर्डे गावाजवळ रविवार पहाटे खासगी बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात ४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १३ प्रवासी जखमी झाले आहेत.  साईपूजा ट्रॅव्हल्सची बस मुंबईहून सिंधुदुर्गाकडे जात असताना हा अपघात झाला. पहाटेच्यावेळी जात असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याशेजारील झाडावर जाऊन आदळली. या दुर्घटनेत चार प्रवासी जागीच ठार झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.