दिवा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रुळ दुरूस्त झाल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र लोकल अद्यापही २०-२५ मिनिटे उशिराने धावत आहेत. याचा सर्वात मोठा फटका जलद मार्गावरील वाहतूकीला पडला आहे. त्यामुळे मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर ताटकळत उभे रहावे लागणार आहे.