मध्य रेल्वेचे रडगाणे आता मुंबईकरांसाठी रोजचेच झाले आहे. सोमवारी सकाळी मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने कल्याणकडे जाणारी रेल्वे वाहतूक उशीराने सुरू आहे. कल्याणकडे जाणाऱया लोकल गाड्या तब्बल २० ते २५ मिनिटे उशीराने धावत आहेत. कल्याणच्या दिशेने जाणाऱया धीम्या लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्याने रेल्वे वाहतूकीवर ताण पडला आहे. सकाळी गर्दीच्या वेळी रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.