अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये रेल्वेरुळ तुटल्याने मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर गुरुवारी सकाळी परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या बदलापूर, कर्जतकडे जाणाऱया डाऊन मार्गावरील लोकल सुमारे २५ ते ३० मिनिटे उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वेतर्फे याबाबतची उदघोषणा स्थानकावर करण्यात येत आहे.