आंबेडकरी जनतेने केलेल्या संघर्षांमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळाली. त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न काँग्रेसने करू नये, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलाआहे. महागाईमध्ये होरपळणाऱ्या जनतेला दिलेले कोणतेही वचन काँग्रेसने पाळलेले नाही. काँग्रेसचा वचनपूर्वी मेळावा म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीका रामदास आठवले यांनी केली.