मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
राज्याच्या तिजोरीवरचा भार दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रशासनावरील खर्च कमी करण्यासाठी आता नवीन पदे न भरता आवश्यक असेल तिथे बाह्य़ यंत्रणेद्वारे (आऊट सोर्सिग) कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका कराव्यात, असे आदेश राज्य सरकारने सर्व प्रशासकीय विभागांना दिले आहेत. कंत्राटी पद्धतीचा अवलंब करून किमान १० ते २५ टक्यांपर्यंत प्रशासकीय खर्चात बचत करावी, असे सर्व विभागांना सांगण्यात आले आहे.
सहाव्या वेतन आयोगाचा मोठा आर्थिक बोजा पडल्यामुळे जून २०१० ते २०१२, अशी दोन वर्षे सरकारी नोकर भरतीवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर भरतीवरील बंदी उठविली आणि लगेच दोन महिन्यात, दर वर्षी रिक्त होणाऱ्या पदांपैकी फक्त ३ टक्केच जागा भराव्यात, असा नवीन फतवा राज्य सरकारने काढला. आता पुन्हा नवीन पदे निर्माण न करता कंत्राटी पद्धतीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करा, असा नवा आदेश २ फेब्रुवारीला वित्त विभागाने काढला आहे. आडमार्गाने पुन्हा नोकरभरतीबंदी लादण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.
प्रशासनावरील खर्च कमी करुन विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी बाह्य़यंत्रणेमार्फत मनुष्यबळ घेऊन शक्यतो नवीन पदनिर्मिती व भरती करण्याचे टाळावे, असे वित्त विभागाच्या आदेशात म्हटले आहे. कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोणतेही उत्तरदायित्व सरकारवर राहणार नाही, असा संबंघित कंपन्या व ठेकेदारांशी करार करावा, असे कळविण्यात आले आहे. मनुष्यबळ पुरविणाऱ्या कंपन्यांवर होणारा खर्च हा वेतनावरील खर्च न दाखविता, कार्यालयीन खर्च म्हणून दाखवावा, असे आदेशात म्हटले आहे. नियमित पदनिर्मिती व भरती करुन त्यांच्या वेतनावर होणारा खर्च जमेस धरून, त्याच्या किमान १० ते २५ टक्के कपात होईल, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे सर्व विभागांना सांगण्यात आले आहे.




















ह्या कंत्राटदारांनी किंवा त्यांनी नेमलेल्या मनुष्यबळाने भविष्यात (जर ?! ) भ्रष्टाचार करून ठेवला तर त्याचे उत्तरदायित्व नेमके कोणाचे असेल? व ते सरकारी पातळीवर कसे हाताळले जाणार ते स्पष्ट झाले नाही. आजपर्यंत ज्या-ज्या कंत्राट दरानी घोटाळे-भ्रष्टाचार केलेला आहे किंवा अतिशय वाईट कामे करून ठेवलेली आहेत त्यापैस्की किती जणांना न्यायालयीन मार्गाने शिक्षा झालेली आहे ते जाहीर व्हायला हवे. उलट बर्याच जणांना काहीही शिक्षा वगैरे न होता त्यांचे नाव काळ्या यादीतून पुन्हा पांढऱ्या यादीत टाकून नवीन कंत्राटे त्यांना बक्षीस म्हणून दिली गेल्याच्याच बातम्या आज पर्यंत आलेल्या आहेत.