प्रस्तावित अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यामुळे हिंदूंच्या अनेक धार्मिक प्रथा परंपरांवर बंधने येऊ शकतात. या विधेयकाला तीव्र विरोध असतानाही हे विधेयक सरकारने मंजूर केले तर लक्षावधी वारकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा आळंदी येथे झालेल्या राज्यस्तरीय वारकरी अधिवेशनात देण्यात आला. त्याचप्रमाणे आधी गोहत्याबंदी विधेयक मंजूर करा, अशी मागणीही करण्यात आली.