औरंगाबाद येथील शिक्षक मोर्चात झालेल्या पोलीस आणि शिक्षकांच्या हाणामारीत शिक्षकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार सतीश पतकी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीदर‌म्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आश्वसान दिले.
या वेळी सतीश पतकी यांनी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. विनाअनुदान तत्वावरील घोषित केलेल्या शाळांसाठी २० टक्के अनुदानासाठी लागू केलेल्या जाचक अटी मागणे घ्याव्यात ही मागणी प्रामुख्याने करण्यात आली. विनाअनुदानित शाळांना २० टक्के अनुदान देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन फडणवीस यांनी या वेळी दिले.