सलग दोन दिवस सुट्या असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. माणगावजवळ सुमारे २ ते ३ किमी वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. सुमारे अर्धा ते पाऊण तासापासून वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू आहे. दर शनिवारी व रविवारी या मार्गावर अशीच वाहतूक कोंडी होते, असे स्थानिकांनी म्हटले आहे.