महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केलेल्या विविध मागण्या लवकर मंजूर कराव्यात, अशी शिफारस गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. पाच दिवसांचा आठवडा, महिला कर्मचाऱ्यांना एक वर्षांची बालसंगोपन रजा, अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे विकेंद्रीकरण आदी मागण्या महासंघाने केल्या होत्या. महासंघाचे मुख्य सल्लागार ग. वि. कुलथे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पाटील यांना निवेदन सादर केले. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिल्याचे सांगण्यात आले.