पवईतील आयआयटी कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळी  जितेश शर्मा या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.
जितेश हा केमिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. मित्र बाहेर गेले असताना जितेश रूममध्ये एकटाच होता. त्याचवेळी त्याने विष प्राशन केले.  हॉस्टेल १५ मध्ये सदर घटना घडली आहे . दम्यान, पोलिसांना जितेशने आत्महत्येपूर्वी लिहलेले पत्र मिळाले असून ते याबाबत अधिक तपास करत आहेत.