मुंबईहून कर्जकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. मालगाडीचे इंजिन घसरल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. मालवाहतूक करणाऱया मालगाडीचे इंजिन अंबरनाथ-बदलापूर दरम्यान रेल्वे रुळावरून घसरले. यामुळे कर्जतकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच या मार्गावरून जाणाऱया सर्व गाड्यांचे वेळापत्रक देखील या अपघातामुळे कोलमडले आहे. १ मे महाराष्ट्र दिन सुटीचा दिवस असल्याने प्रवाशांची वर्दळ कमी असली तरी, सुटीच्या निमित्ताने नातेवाईकांकडे किंवा फेरफटका मारण्यासाठी निघालेल्यांना प्रवासाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.