हार्बर वगळता त्यानंतरच्या सर्व गाडय़ा कुल्र्याहून सुटणार, ‘मरे’चा विशेष ब्लॉक
मध्य रेल्वेवर बुधवारी झालेल्या तांत्रिक बिघाड गोंधळाने रुळावरून घसरलेले वेळापत्रक अद्याप रखडलेले असतानाच शनिवारी मध्यरात्री मध्य रेल्वेवर विशेष जम्बो ब्लॉक होणार असल्याने रेल्वे गोंधळ कायमच राहाणार आहे. कुर्ला येथील कसाईवाडा भागातून रेल्वेमार्गावरून पूर्व-पश्चिम जाणारा पादचारी पूल बांधण्यासाठी शनिवारी मध्यरात्री १२.१५ पासून रविवारी सकाळी ६.१५ पर्यंत हा ब्लॉक होणार आहे. त्यामुळे सीएसटीहूनकर्जतकडे जाणारी शेवटची गाडी रात्री साडेअकरा वाजता तर हार्बरची शेवटची गाडी ११.३८ वाजता सुटेल. पहिली गाडी रविवारी पहाटे ५ नंतर रवाना होईल. त्यानंतरच्या काही गाडय़ा कुर्ला स्थानकातून तर सीएसटी-खोपोली ही गाडी ठाणे स्थानकातून सुटणार आहे. सीएसटीहून पहिली गाडी रविवारी पहाटे ५.५२ वाजता सुटेल.
ब्लॉकच्या काळात मुख्य मार्गावरील तब्बल २४ आणि हार्बर मार्गावरील २८ सेवा रद्द असतील. त्यामुळे उपनगरी प्रवाशांच्या वाटय़ाला खडतर प्रवास येणार आहे. अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळाही बदलल्या जाणार आहेत. तसेच रविवारी मुंबई-पुणे-मुंबई सिंहगड एस्क्प्रेस आणि मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस रद्द राहाणार असल्याने रविवारीही रेल्वे गोंधळ सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.
बुधवारचा रेल्वेगोंधळ रात्री आठ वाजता सुरू होऊनही प्रवाशांचे हाल कमी व्हावेत यासाठी सार्वजनिक रस्ता वाहतुकीच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन सरकारी यंत्रणेनेही केले नाही. आता या ब्लॉकच्या काळात मुख्य मार्गावरील प्रवाशांना कुल्र्याहून कल्याणच्या दिशेने जाता येणार असले तरी हार्बर प्रवाशांसाठी अशा विशेष गाडय़ांची कोणतीही सोय रेल्वेने केलेली नाही. ट्रान्स हार्बरवरूनही अशी सोय करण्याचे नियोजन नाही. त्यामुळे हार्बर प्रवाशांचे हाल अधिकच होणार आहेत.

रविवारी रद्द झालेल्या गाडय़ा
* पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस
* मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस
* मनमाड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस
* मुंबई-मनमाड राज्यराणी एक्सप्रेस
लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचे बदल
* एर्नाकुलम-मुंबई वातानुकुलित विशेष गाडी ठाण्यापर्यंतच.
* भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस दादपर्यंतच.
* मंगळूर-मुंबई एक्सप्रेस दादपर्यंतच.
* साईनगर शिर्डी-मुंबई जलद पॅसेंजर दादपर्यंतच.
* अमरावती-मुंबई एक्सप्रेस दादपर्यंतच.
* गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस दादपर्यंतच.

Untitled-18