मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. माहीम रेल्वे स्थानकानजीक सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरूस्तीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते.

गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास पश्चिम रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. रेल्वे प्रशासनाने लगेचच दुरूस्तीचे काम हाती घेतल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ने दिले आहे. परंतु, यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहे. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.