रिक्षाचा अपघात झाल्याने जबर मानसिक धक्का बसल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. माखनलाल पटवा असे या मृत प्रवाशाचे नाव असून गुरुवारी सकाळी बोरिवलीत ही दुर्घटना घडली. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी बोरिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाले होते. रिक्षा वेगात असल्याने बोरिवलीच्या आयसी कॉलनी येथे रिक्षा कलंडली. यामुळे जबर धक्का बसलेल्या पटवा यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.