केंद्र सरकारने जाहीर केलेला सहा टक्के वाढीव महागाई भत्ता राज्यातील आयएएस, आयपीएस व इतर केंद्रीय अधिकाऱ्यांना १ जानेवारीपासून लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता देण्याबाबत शासनाने अजून निर्णय घेतलेला नाही. राज्य कर्मचाऱ्यांचेही त्याबाबत शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
केंद्र सरकारने या पूर्वी जुलै २०१४ पासून ७ टक्के महागाई भत्ता वाढ जाहीर केली होती. राज्य सरकारने ती आयएएस अधिकाऱ्यांना त्याच तारखेपासून लागू केली.